दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

अहमदनगर

प्रसंगावधनामुळे वाचले शेतकऱ्याचे प्राण तेरा वर्षांच्या मुलाचे साहस : पाथर्डी तालुक्यातील घटना

प्रतिनिधी : मयुर मांडलिक ( नेवासा ) 

पाथर्डी : अवघ्या तेरा वर्षांच्या मुलाने दाखवलेल्या प्रसंगावधनामुळे गळफास घेणाऱ्या एका शेतकऱ्याचे प्राण वाचले आहे तालुक्यातील कोल्हार येथील शेतकऱ्याचे प्राण वाचवनाऱ्या ॲड प्रविण पालवे यांचे भाचे अथर्व अशोक खेडकर याचे कौतुक होत आहे 

अथर्व हा मूळ तालुक्यातील चिंचपुर येथे राहणारा सध्या शाळेला सुट्टी असल्याने तो आपल्या मामाच्या गावी आला होता 24 एप्रिल रोजी मामाच्या घरासमोर उभा असताना एका महिलेचा वाचवा वाचवा असा आवाज आला तो आवाजाच्या दिशेने धावत गेला शेजारील शेतात कोल्हार येथील शेतकरी बाळासाहेब विष्णू पालवे हे झाडाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या करत होते हा प्रसंग पाहताच अथर्व ने त्यांचे दोन पाय खालून उचलून धरले तो पर्यंत पालवेंच्या पत्नीच्या आवाजाने शेजारील शेतकरी घटनास्थळी दाखल झाले पालवे याला खाली उतरवत तत्काळ नगर येथील दवखण्यात उपचारासाठी नेले आठ दिवस उपचार केल्यानंतर पालवे यांना दवाखान्यातून घरी आणण्यात आले अथर्व च्या या धाडसामुळे पालवे यांचे प्राण वाचले या धाडसामुळे कोल्हार येथील ग्रामपंचायतीने ठराव करीत अथर्व याच्या धाडसाचे कौतुक केले पोलिस निरीक्षक  सुहास चव्हाण यांनी अथर्व ला पोलीस स्टेशन येथे बोलुन घेऊन गौरव केला तालुक्यातील सर्वच पक्षाच्या नेत्यांनी अथर्व याचे कौतुक केले

 

 

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे