दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

अहमदनगर

अतिवृष्टीची नुकसान भरपाई द्या….अन्यथा अर्धनग्न आंदोलन

नेवासा प्रतिनिधी।मागील वर्षेी अतिवृष्टीने नेवासा तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्याचे कपाशी,तुर,बाजरी,मका,व फळ बाग या पिकांचे नुकसान झाले होते,सदर पिकांचे मागील वर्षी पंचनामे देखील करण्यात आले होते.अगोदरच पाऊस पडत नसल्याने खचून गेलेला बळीराजा पिकाप्रमाणे अर्धमेला झाला आहे.त्यात उशीरा का होईना बळीराज्याच्या आर्त हाकेला प्रतिसाद देत परिसरातील शेतकरी वर्गावर शासनाची कृपा झाली आणि मागील वर्षी अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडलेल्या पिकाची भरपाई मंजूर होऊन ही यादी मध्ये नावे येऊन ही नुकसान भरपाई आली नसून शेतकरी वर्गात नाराजी आहे. नुकसान भरपाई आली नसून त्वरित नुकसान भरपाई जमा करावी अन्यथा नाविलाजास्तव प्रशासनाच्या विरोधात जीवन ज्योत फाऊंडेशन च्या वतीने दि.07/09/2023 रोजी ठिक सकाळी तहसीलदार कार्यालय समोर अर्धनग्न अवस्थेत बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल.असे निवेदन तहसील यांना देण्यात आले या वेळी कमलेश नवले,छत्रपती युना सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष नरेंद्र नवथर,सत्यमेव जयते प्रतिष्ठान चे जैद शेख,अक्षय बोधक,हेमंत चामुटे,राहुल कागुणे,आप्पासाहेब आरगडे,प्रदीप आरगडे,स्वप्निल गरड,मनोज आरगडे,अभिजीत बोधक,तोफीक शेख, अनेक शेतकरी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे