दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ई-पेपर

जनावरांमध्ये लम्पि रोगाच्या संसर्गाने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण…..

प्रतिनिधी-अजय ठाकरे

नाशिक प्रतिनिधी।बागलाण तालुक्यासह पश्चिम पट्ट्यातील भागातील ग्रामिणपट्यत लंपी स्किन डिसीज हा प्रमुख्याने गाई, बैल, वासरे यांना होणारा विषाणुजन्य साथीचा आजार आहे. जनावरे या विषाणूला लवकर बळी पडतात. हा आजार नवीन नाही २०१९ मध्ये भारताच्या काही भागात हा आढळून आला आहे. त्यातच महाराष्ट्राच्या अनेक भागात तो आता झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग व पशु व्यावसायिकांना या नवीन संकटाचा सामना करावा लागत आहे. हा विषाणुजन्य आजार आहे जनावरे अशक्त होतात. तसेच रोगट वासरु जन्माला येणे व जनावरांची दूध उत्पादन क्षमता घटते व प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. सुरुवातीला जनावरास दोन – तीन दिवस ताप जाणवातो यानंतर जनावरांच्या सर्व शरीरावर कडक व गोल आकाराच्या गाठी येतात. या गाठी ४ ते ५ दिवसात फुटतात आणि त्यातून पस बाहेर येते. या गाठी सर्वसाधारणपणे पोट, पाठ, पाय व जननेंद्रियाच्या भागात येतात. डोळे व नाकातून स्राव येतो. तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाता येत नाही. पायावरील गाठीमुळे जनावराला चालणे कठीण होते या आजारातून बरे होण्यास दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे पशुपालकांचे मोठे नुकसान होत आहे. सरकारने मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना स्वताःच लस विकत घ्यावी लागते व शेतकरी वर्ग आर्थिक झळ सोसून खाजगी पशुवैद्यकीय व्यावसायिक यांच्याकडून उपचार करुन घेत असल्यामुळे असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे