दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

अहमदनगर

हंडीनिमगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता चौथी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

बाळासाहेब पिसाळ

नेवासा तालुक्यातील हंडीनिमगाव येथे दि.26 एप्रिल 2022 रोजी इयत्ता चौथी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष व सदस्य यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून,स्वयंभू त्रिवेणीश्वर संस्थान चे मठाधिपती महंत रमेशानंदगिरी महाराज,सद्गुरू किसनगिरी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आरगडे सर,उपमुख्याध्यापक श्री क्षीरसागर सर लाभले होते,
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रास्तविक गवळी मॅडम यांनी केले,त्यानंतर उपस्थिती सर्व महंत रमेशानंद गिरी महाराज यांचा सन्मान करण्यात आला, व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला,इयत्ता चौथी च्या विद्यार्थ्यांचे मनोगत सादर झाले,इयत्ता चौथी च्या विदयार्थी यांच्या वतीने शाळेसाठी पाण्याच्या जार साठी तीन थर्मास शाळेसाठी भेट देण्यात आले.
व्यासपीठावर उपस्थित मान्यवर यांचे मनोगत झाले.विद्यार्थ्यांच्या वतीने महंत रमेशानंद गिरी महाराज व शाळेतील शिक्षक यांचा सन्मान भेटवस्तू देऊन करण्यात आला. सर्व विद्यार्थी आणि उपस्थित ग्रामस्थ,पालक,यांना स्नेहभोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला,
(शिवशक्ती एक्वा)यांच्या वतीने थंडगार पाणी पुढील शैक्षणिकवर्षी देण्याचे आश्वासन सोनू पिटेकर यांनी दिले,स्नेहभोजनाचे सौजन्य रमेश जाधव यांनी दिले,
या कार्यक्रमासाठी आवर्जून जी.प.प्रा.शाळा,शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष व त्यांचे सदस्य,हंडीनीमगाव ग्रा.प.चे ग्रामसेवक,सरपंच,उपसरपंच,सदस्य,ग्रामस्थ, विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी.प.प्राथमिक शाळेचे श्री दरवडे सर यांनी केले

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे