दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

अहमदनगर

शेतकऱ्यासह १३ वार्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू….जिल्ह्यातील धक्कादायक घटना..!

अहमदनगर प्रतिनिधी। शेतामध्ये पेरणी सुरू असताना बांधावर घातल्याने झालेल्या अपघातात पेरणी यंत्रावर बसलेल्या शेतकऱ्याचा व १३ वार्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू झाला.वाडेगव्हाणमधील अलभरवाडी शिवारात शुक्रवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. याप्रकरणी ट्रॅक्टर चालक जालिंदर नानाभाऊ गुलदगड (वय ३८ रा. यादववाडी, तरडे मळा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येउन त्यास अटक करण्यात आली आहे.सुपे पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार दि. २४ रोजी दुपारी जालिंदर दुलदगड हा वाडेगव्हाण शिवारातील शेतामध्ये छोटया ट्रॅक्टरने पेरणी करीत होता.पेरणी यंत्रावर तुकाराम भिमाजी तरडे (वय वय ४८) व शुभम दत्तात्रेय तरडे (वय १३) हे बसलेले होते. पेरणी सुरू असताना दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास चालक जालिंदर याने अविचाराने ट्रॅक्टर चालवून तो बांधावर घातला.बांधावर गेलेला ट्रॅक्टर पलटी होऊन त्याखाली तुकाराम भिमाजी तरडे व शुभम दत्तात्रेय तरडे हे चिरडले गेले. त्यातच त्यांचा दुर्देवी अंत झाला. दुर्घटनेनंतर परीसरातील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली.सुपे पोलिसांना त्याबाबतची माहीती देण्यात आल्यानंतर पोलिस निरीक्षक डॉ. नितिनकुमार गोकावे यांनी पोलिस कर्मचायांसह घटनास्थळी भेट दिली. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात येउन अपघातग्रस्त ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे