दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

अहमदनगर

किरकोळ कारणातून महिलेला मारहाण करत तिचा विनयभंग;एकाविरुद्ध गुन्हा दाखल….

अहमदनगर प्रतिनिधी।नगर शहरात महिलांवर अत्याचार, मारहाण अशा घटना घडू लागल्या आहेत. यामुळे महिलांच्या अस्तित्वच धोक्यात येऊ लागले आहे. नुकतेच अशीच एक धक्कादायक घटना नगर शहरात घडली आहे.किरकोळ कारणातून महिलेला मारहाण करत तिचा विनयभंग केल्याची घटना नगर शहरात घडली. याप्रकरणी पिडीत महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खालीद बाबर सय्यद (वय 25 रा. झेंडीगेट, नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे.याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी त्यांच्या वडिलांना जेवण घेऊन गेल्या असतान सय्यद हा तेथे त्याची गाडी लावत होता. तेव्हा फिर्यादी त्याला म्हणाल्या, ‘माझ्या वडिलांचे वय झाले आहे, त्यांना चालता येत नाही, तू येथे गाडी लावू नकोस’.
असे म्हणताच सय्यद याला त्यांचा राग आला. त्याने फिर्यादीला शिवीगाळ करून मारहाण केली व त्यांचा विनयभंग केला आहे. भांडण सोडविण्यासाठी फिर्यादीचा भाऊ गेला असता त्यांना देखील सय्यद याने मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे