दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

नांदेड

गावात सामाजिक सलोखा असेल तरच विकासकामांना गती मिळेल – शेकाप महिला प्रदेशाध्यक्षा सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे.

कंधार प्रतिनिधी(एम.जे.सय्यद)

कंधार प्रतिनिधी(एम.जे.सय्यद) :- आज आलेगाव ता.कंधार येथील ग्रामपंचायत आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांच्या नेतृत्वात दणदणीत विजय मिळवला. आज सरपंच निवड कार्यक्रमास शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ आशाताई श्यामसुंदर शिंदे उपस्थित राहून नवनिर्वाचित सरपंच बळवंत पाटील वर्ताळे, उपसरपंच सारजाबाई मारोतराव मोरे, सदस्य सुंदरबाई लक्ष्मण मोरे, सदस्य प्रकाश मोरे, सदस्य मोहन मोरे, सदस्य रुकमिनबाई कुद्रे, सदस्य मोहन आंबटवाड यांचा सौ.आशाताई शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

प्रसंगी आशाताईंनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी गावकऱ्यांच्या वतीने आशाताई यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना आशाताई म्हणाल्या की,गावात आता गट तट विसरून एकोपा राखूनच आपण गावातील विकासकामे करावीत यामुळे कामे लवकर आणि अधिक चागले होतील याप्रसंगी आशाताईंनी गावकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या यावेळी नागोराव पाटील आलेगावकर, पोलीस पाटील वसंतराव पाटील मोरे, दादाराव पाटील मोरे, तंटामुक्ती अध्यक्ष सज्जन पाटील मोरे, सरपंच प्रतिनिधी गिरीश डीगोळे, आनंद पाटील मोरे, प्रकाश बळीराम मोरे, खुशाल पाटील मोरे, बळवंत मोरे, परमेश्वर वर्ताळे, अविनाश आंबटवाड, गंबर आंबटवाड सह कार्यकर्ते, गावकरी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे