दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ई-पेपर

सटाणा ते वाठोडा लालपरी सुरू करण्याची मागणी सटाणा आगार डेपो मॅनेजर यांना निवेदन देण्यात आले…

प्रतिनिधी /अजय ठाकरे

नाशिक प्रतिनिधी।सटाणा ते वाठोडा गावांना तालुका ला जोडणाऱ्या मार्गावर मागील दहा बारा महिन्यापासून परिवहन मंडळाची बस सेवा बंद असून तालुक्यापासून 40 ते 45 किलोमीटर चा प्रवास वाहनाच्या अभावाने नागरिकांसाठी खडतर ठरला आहे. लोकप्रतिनिधींनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन बस सेवा सुरू करण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. कोरोनाची दुसरी लाट आणि त्यासाठी लागू केलेली संचारबंदी पासून या भागात आज पर्यंत परिवहन मंडळाची लाल परी अद्याप धावली नाही
वाठोडा ते सटाणा या पर्यंत मार्ग सुरळीत सुरु झालेला आहे. तेव्हा या मार्गावरील बस सेवा सुरु करण्यास अडचण नाही. सध्या शेतीची कामे, शैक्षणिक कामे,विद्यार्थी ची शाळा,दवाखाना, कार्यालयीन कामे, करण्याची वेळ आहे. तालुका ते जिल्हा स्तरांवरील कामासाठी नागरिकांना पायपट्टी करावी लागते आहे. अशातच बससेवा सुरु नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. तेव्हा या भागातील लोकप्रतिनिधींनी नागरिकांची समस्या लक्षात घेऊन बससेवेचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी परिसरातील नागरिक श्नी.बाबुलाल महाराज ठाकरे, नामदेव खांडवी, चिंतामण आनंदा ठाकरे ,संजय ठाकरे ,हरिश्चंद्र ठाकरे ,रमेश चौरे, आत्माराम ठाकरे मोहन गायकवाड, शामराव खांडवी, बारकू जाधव् आदी ग्रामस्थांनी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे