एसटी कामगारांचा सलग ११व्या दिवशी संप सूरूच;परीवहन मंञी अनिल परब यांच्या सोबत बैठकावर बैठका परंतु तिढा माञ कायम.
दौंड : एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करावे यासाठी दौंड आगाराचे कर्मचारी दि. ८/११/२०२१ पासून बेमुदत संपावर गेले आहेत. यावर अनेक बैठका झाल्या परंतु तिढा कायम आहे त्यामुळे मा. मुख्यमंत्री साहेबांनी लक्ष घालावे असे कामगारांच्या वतीने सांगण्यात येत आहे.
एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना कमी पगार व कामाचा अतिरिक्त ताण, कर्जबाजारीपणा व अनियमित वेतनामुळे ३८ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यामुळे राज्यातील सर्व कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. दौंड आगारातील कामगार सुध्दा बेमुदत संपावर गेले आहेत. संपामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होत असल्याने राज्य सरकारने लवकरच निर्णय घेणे गरजेचे असताना सरकारकडून माञ आंदोलन चिघळले जात असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे त्यातच १५ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून रोजंदार गट क्र. १ कामगारांना कामावर हजर व्हा अन्यथा सेवा समाप्त करण्यात येईल अशी नोटीस बजावली आहे. कामगारांच्या संपाबाबत तोडगा काढण्यासाठी दि. १७/११/२०२१ रोजी मा. महीम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची कर्मचारी शिष्टमंडळाने भेट घेतली.
एसटीचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण झाल्याशिवाय संप मागे घेतला जाणार नाही असे कामगारांच्या वतीने सांगण्यात येत आहे.