गोरेगाव शहरा सह परिसरात भावपूर्ण वातावरणात पाच दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन….
अजय होळकर प्रतिनिधी
रायगड प्रतिनिधी।जग भरात कोरोनाचे संकट पसरले आहे व कोरोना आपल्या देशातून पूर्णपणे समाप्त करण्याकरिता शासनाकडून कडक निर्बंध लागू करण्यात आल्यामुळे सर्व सण साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत, कोरोना काळातील गणपती सणाचा हा दुसरा वर्ष ही शासनाकडून लावलेल्या निर्बंधांचे पालन करत महाराष्ट्र राज्य तसेच पूर्ण जगात गणेशोत्सव सण साजरा करण्यात येत आहे. माणगाव तालुक्यातील गोरेगाव शहर तसेच पूर्ण परिसरात काल रोजी आगमन झालेल्या पाच दिवसाच्या घरगुती गणपती बाप्पांना भक्तांकडून भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आले. व ” गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया” च्या घोषणा देत आज रोजी गणेशभक्तांकडून बाप्पांचे विसर्जन करण्यात आले, या वेळी गणेश भक्तांकडून जगावरील कोरोनाचे संकट दूर होऊन देशातील नागरिकांचे जीवन सुरळीत होण्यासाठी व सर्विकडे सुख व समृद्धी पासरण्याकरिता गणरायाला साकडे घालण्यात आले.