दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ई-पेपर

उल्हासनगरमध्ये भरदिवसा 5 गुंडांनी केली तरुणाची हत्या….

प्रातिनिधि- हर्षद यरवलकर

मुंबई प्रतिनिधी।उल्हासनगरमध्ये दिवसेंदिवस वाढत चालेल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे परिसर हादरून गेला आहे. आज पुन्हा एकदा उल्हासनगर कॅम्प 4 च्या नेताजी चौक बंगलो परिसरात एका तरुणाची 5 जणांच्या टोळक्याने भर रस्त्यावर निर्दयीपणे हत्या केली आहे हा सगळा प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उल्हासनगरमधील  कॅम्प 4 मधील नेताजी चौक बंगलो परिसरात दुपारच्या सुमारास ही थरारक घटना घडली. सुशांत गायकवाड असं मृत तरुणाचं नाव आहे. पाच जणांच्या टोळीने सुशांतची हत्या केली.जीव वाचवण्या साठी तो गयवया करत होता पन बदल्या ची भावना वा त्याचा मनात राग ठेवून देयेची भीक ना दाखवता अमानुष पणे भर दुपारी वर्दळीच्या ठिकाणी चाकू, तलवारी आणि लोखंडी रॉडने सपासप वार करून ही हत्या कऱण्यात आली होती. दरम्यान, ही हत्या करणाऱ्या आणि विविध पोलीस ठाण्यात 9 गुन्हे दाखल असलेल्या गुंड आकाश शिंदे उर्फ चिंट्या आणि त्याचे साथीदार अमोल मोरे उर्फ वांग्या, आकाश खडसे, अवी थोरात आणि यश रुपवते यांना अटक केली.हिललाईन आणि विठ्ठलवाडी पोलिसांनी अवघ्या दोन तासात ही कामगिरी केली. जुन्या वादा वरुन ही हत्या झाल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी दिली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे