दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

औरंगाबादशिक्षण

*दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यासाठी औरंगाबादच्या विद्यार्थ्याची खंडपीठात याचिका दाखल..*

सहसंपादक: स्वप्नील बनसोडे

*दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यासाठी औरंगाबादच्या विद्यार्थ्याची खंडपीठात याचिका दाखल..*

बारावीच्या लेखी परीक्षा 4 मार्चे ते 7 एप्रिल या कालावधीत घेण्यात येणार आहेत. बारावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी आणि लेखी परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत होणार आहेत, असे याआधीच शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. या निर्णयाविरोधात औरंगाबादच्या विद्यार्थ्याने याचिका दाखल केल

▪️कोरोना संकटामुळे मागील वर्षभर शाळा अनियमित झाल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचा पुरेसा अभ्यास झालेला नाही. आता मार्च महिन्यात परीक्षांच्या तारखा घोषित झाल्यामुळे विद्यार्थ्यांवर परीक्षेचे दडपणे आले आहे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.

▪️त्यामुळे त्याने केलेल्या याचिकेत, दहावी-बारावीची परीक्षा शक्य असेल तर ऑनलाइन घेण्यात यावी अन्यथा अभ्यासक्रम पूर्ण न झाल्याने अभ्यास करण्यासाठी परीक्षा दोन महिने पुढे ढकलण्यात याव्यात, अशी विनंती करण्यात आली आहे.

▪️तसेच 4 फेब्रुवारी रोजीच्या परीक्षेसंबंधीच्या अधीसूचनेला स्थगिती द्यावी आणि ती रद्द करावी, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. याचिकेवर 22 फेब्रुवारी रोजी सुनावणी अपेक्षित आहे. या प्रकरणी ॲड. बाबासाहेब भाले हे याचिकाकर्त्याकडून काम पहात आहेत.

( केवळ बातमी आणि माहितीच नाही तर ज्ञानाचा सुद्धा प्रसार करतो आम्ही…)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_*? जाहिरात करण्यासाठी संपर्क- 9284543318*_

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे