कन्नड प्रतिनिधी।तालुक्यातील मुंडवाडी येथे स्वामी विवेकानंद ग्रामिण विकास प्रतिष्ठाण आयोजित “शेतीतून… कृषी प्रक्रिया उद्योगाकडे… योजनांची सविस्तर माहिती, चर्चा व मार्गदर्शन आयोजित केले होते.
यावेळी उदय देवळाणकर यांनी
१) शेतकरी कंपनी म्हणजे काय❓
२) शेतीमालाला भाव कसा मिळवायचा❓
३)पोकरा योजनेतून शेतकरी कंपनीस, महीला बचतगटास, शेतकरी गटास किती अनुदान आहे❓
४)पोकरा योजना आणि केंद्र व राज्य सरकारच्या शेतीस अनुदान किती❓
५) कृषीप्रक्रिया उद्योग, अन्नप्रक्रिया व संधी
या विषयी महीला बचतगटास व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे मार्गदर्शन मा. श्री. उदय देवळाणकर साहेब (मा. सचिव कृषी मुल्य आयोग) यांनी केले. यावेळी अनिल घुगे, प्रतिष्ठाणचे अध्यक्ष तथा उपसरपंच काकासाहेब तायडे, सचीव रामेश्वर मोरे, सरपंच गोविंद सोनवणे, अंकुर रोपवाटीकेचे संचालक बारगळ, रामेश्वर घनकर, भगवान बारगळ, माधवराव तायडे, जनार्दन बारगळ, भागीनाथ बारगळ, पोपट बारगळ आदी उपस्थित होते.